Advertisement
करोना महामारी काळात अनेक मुलांनी आपल्या माता-पित्यांना गमावले आहे. अशा अनाथ मुलांचा शिक्षणाचा खर्ज उचलण्यासाठी अनेक राज्ये पुढे आली आहेत. आता पंजाब सरकारने देखील अशा मुलांना पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्याची घोषणा केली आहे. या मुलांचा शिक्षणाचा सर्व खर्च सरकार उचलणार आहे. पंजाब सरकारने असे म्हटले आहे की राज्यात ज्या मुलांनी आपल्या माता-पित्यांना करोनामुळे गमावले आहे, किंवा ज्यांच्या कुटुंबातील कमावणाऱ्या सदस्याचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे अशा मुलांना पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्यात येणार आहे. शिक्षणाचा सर्व खर्च तर सरकार उचलणार आहेच, शिवाय सामाजिक सुरक्षा पेंशन म्हणून दरमहा १५०० रुपये या मुलांना दिले जाणार आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी ANI या वृत्तसंस्थेला सांगितले की, 'ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांना किंवा कुटुंबाला गमावलं आहे, महामारीमुळे कुटुंबातील सदस्य गमावणाऱ्या या मुलांसाठी एक नवी योजना आणण्यात येत आहे. याअंतर्गत पदवी स्तरापर्यंतचे मोफत शिक्षण या मुलांना दिले जाईल. असे करणे राज्याचे कर्तव्य आहे, असेही सीएम कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सांगितले आहे. यासंबंधी दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्ष वयापर्यंत म्हणजेच पदवी स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयीन शिक्षण मोफत देण्यात येईल. कोविड - १९ महामारीमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्यासह, ज्या कुटुंबांनी आपला कमावता सदस्य गमावला आहे त्या मुलांना दरमहा १५०० रुपयांचे सामाजिक सुरक्षा पेन्शन दिले जाणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2RzSUHn
via nmkadda