Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १ जून, २०२१, जून ०१, २०२१ WIB
Last Updated 2021-06-01T16:47:05Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

बारावी परीक्षा रद्द: वर्षा गायकवाड यांनी केले केंद्राच्या निर्णयाचे स्वागत Rojgar News

Advertisement
CBSE Exam 2021 Cancelled: विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही आपली कायम प्राथमिकता असायला हवी, असे म्हणत महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकारच्या रद्द करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. राज्यातल्या बारावीच्या परीक्षांबाबतही लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना त्यांनी, ' घरी रहा आणि काळजी घ्या,' असा सल्ला दिला आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'करोनाची सध्याची परिस्थिती, व आजारांचा मुलांवर होणारा वाढता प्रार्दुभाव आणि परीक्षेच्या संभ्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात वाढलेला तणाव विचारात घेता परीक्षा ऐवजी पर्यायी व्यवस्थेचा विचार करावा तसेच केंद्र सरकारने देश पातळीवर या संदर्भात एकसूत्र धोरण निश्चित करावे ही मागणी महाराष्ट्र शासनाने केली होती. या मागण्यांचा विचार करता केंद्र सरकारने CBSE ची बारावीची परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा निश्चितच स्वागतार्ह आहे. मुलाच्या शैक्षणिक जीवनातील बारावी परीक्षा ही महत्त्वाची पायरी असली तरीही सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा ही आपल्या सर्वांची प्राथमिकता असली पाहिजे. या पुढे महाराष्ट्र शासन ही महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांबाबत ही विद्यार्थ्यांचे आरोग्य व हित जोपासून लवकरच निर्णय घेईल.' दरम्यान, केंद्र सरकारने सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा अखेर रद्द केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/34y8XZc
via nmkadda