Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ३ जून, २०२१, जून ०३, २०२१ WIB
Last Updated 2021-06-03T11:47:19Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

अखेर औपचारिक घोषणा; राज्यातील दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द Rojgar News

Advertisement
दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मदत व पुनर्वसन खात्याच्या बैठकीत घेण्यात आला. मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भातील घोषणा केली. या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सचिव, पुनर्वसन खात्याचे सदस्य उपस्थित होते. करोनाची सद्यस्थिती पाहून आम्ही आमच्या अधिकारात हा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊन तसे शासनास कळवले, असे वडेट्टीवार म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आणि नंतर राज्यात ज्यांचा परीक्षा रद्द च्या निर्णयाला विरोध होता, त्यांचाही विरोध मावळला. तत्पूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या परीक्षा रद्द करण्याबाबतची आपली भूमिका जाहीर केली होती. मात्र औपचारिकपणे प्रस्ताव मदत व पुनर्वसन खात्याकडे पाठवून या प्रस्तावास मंजुरी देत राज्य सरकारने आणि मदत व पुनर्वसन खात्याने हा निर्णय घेतला, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली. दरम्यान, राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी राज्य सरकारच्या मदत, पुनर्वसन खात्याकडे परीक्षांसंदर्भातला प्रस्ताव पाठवण्यात आल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर गुरुवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयात बारावी परीक्षांसंदर्भातील सुनावणी झाली. तेथे परीक्षा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने आनंद व्यक्त केला. त्यानंतर राज्यात मुंबई हायकोर्टात दहावीच्या परीक्षा घ्याव्यात अशी मागणी करणारी याचिका निकाली निघाली. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावी, रद्द करत असल्याचा निर्णय औपचारिकपणे जाहीर केला.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3z0Xgbu
via nmkadda