Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ०९, २०२१ WIB
Last Updated 2021-08-09T12:43:58Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

अकरावी प्रवेशांसाठी नोंदणी प्रक्रिया १६ ऑगस्टपासून Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे पुण्यासह राज्यातील शहरांत केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या अकरावी प्रवेशांची नोंदणी १६ ऑगस्टपासून करता येणार आहे. आजपासून (सोमवार, ९ ऑगस्ट) ही प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया सात दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. पुण्यासह मुंबई महानगर क्षेत्र, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रांतील अकरावीचे प्रवेश दर वर्षी केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होतात. दोन भागांत ही नोंदणी होते. पहिल्या भागात विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती भरणे अपेक्षित असते. ती भरल्याने विद्यार्थी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशांच्या प्रवाहात दाखल होतो. दुसऱ्या भागात विद्यार्थ्यांना मिळालेले गुण आणि त्यांना हवे असलेले महाविद्यालयाचे पर्याय, यांची माहिती द्यावी लागते. यंदा अकरावी प्रवेशांसाठी 'सीईटी' घेण्यात येणार असल्याने दुसऱ्या भागात विद्यार्थ्यांना 'सीईटी'चे गुण नमूद करून महाविद्यालयांचे पर्याय द्यावे लागणार आहेत. यामुळे 'सीईटी' होऊन निकाल लागल्यानंतरच विद्यार्थ्यांना नोंदणीतील दुसरा भाग भरता येणार आहे. पहिल्या भागाची नोंदणी आता १६ ऑगस्टपासून करता येणार आहे. यंदाच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षकांत संभ्रम निर्माण झाला आहे. शिक्षकांना या यंत्रणेसंदर्भात आवश्यक प्रशिक्षण मिळालेले नाही. यामुळे प्रवेशप्रक्रियेची नोंदणी तत्काळ सुरू केल्यास अनेक अडचणी येऊ शकतात; तसेच अद्यापही अनेक महाविद्यालये आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशांसाठी त्यांची नोंदणी केली नसल्यामुळेदेखील नोंदणीप्रक्रिया सात दिवसांनी सुरू करण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात शिक्षकांना यंत्रणेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 'सीईटी'चा निर्णय मंगळवारी अकरावी प्रवेशासाठी आवश्यक करण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेचा (सीईटी) उद्या (मंगळवार, १० ऑगस्ट) निकाल लागणार आहे. 'सीईटी'च्या विरोधातील विद्यार्थी आणि राज्य सरकार या दोघांनी आपापल्या बाजू न्यायालयात मांडल्या असून, आता न्यायालय सीईटी घ्यावी, की नाही; तसेच घेतल्यास ती सर्व माध्यमिक मंडळांच्या अभ्यासक्रमावर आधारित असावी का, त्यात काय बदल व्हावेत, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मंगळवारी मिळणार आहेत. न्यायालयाच्या निर्णयावर आता अकरावी प्रवेशांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37riYJ2
via nmkadda