Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ०६, २०२१ WIB
Last Updated 2021-08-06T14:45:39Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

समान शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी योगदान द्या, मुख्यमंत्र्यांचे आवाहन Rojgar News

Advertisement
Appeal for Better : समान शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी सामाजिक दायित्वाअंतर्गत राज्यातील उद्योजक, कंपन्या, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी योगदान द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांना देखील यामध्ये सहभागी होण्यास त्यांनी सांगितले. शालेय शिक्षण विभागातर्फे शासकीय शाळा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मॉडेल स्कुल” उपक्रमांतर्गत आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन माध्यमातून राज्यातील उद्योजक, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी आणि या क्षेत्रातील तज्ञांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. आज रोटी कपडा मकान या मुलभूत गरजांबरोबर शिक्षणही अत्यावश्यक झाले आहे. ज्याला उत्तम शिक्षण मिळते तो स्वत:च्या क्षमतांवर रोटी, कपडा आणि मकानही मिळवू शकतो. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे गरजेचे आहे. यामध्ये शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या सर्व प्रकारच्या म्हणजे प्रशिक्षण आणि साहित्य निर्मिती,ग्रंथालये, ई-अभ्यासक्रमाची निर्मिती, व्हरच्युअल क्लासरुमची निर्मिती, शाळांचे संगणकीकरण, प्रशिक्षित तज्ज्ञांचे मार्गदर्शन यासारख्या कार्यक्रमाबरोबर पायाभूत सुविधांच्या उभारणीमध्ये ही सामाजिक दायित्वातून गुंतवणूक करता येणार आहे. यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील शाळांच्या दर्जा उंचाविण्यासाठी सामाजिक दायित्व निधी अंतर्गत सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असून आदर्श शाळा निर्मितीसाठी सर्वांनी सहकार्य करावे,असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले. आदर्श शाळा निर्मितीसाठी पहिल्या टप्प्यात ४७१ शाळा निवडण्यात आल्या असून दरवर्षी ५०० शाळांची निवड करण्यात येणार असल्याची शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. यासाठी एक वेबपोर्टल तयार करण्यात येत असल्याचेही त्या म्हणाल्या. शिक्षण क्षेत्रातील गुंतवणूक ही जीवनभरासाठी उपयुक्त ठरते. शिक्षणातील गुंतवणूक ही देशाच्या उभारणीतील गुंतवणूक असते. त्यामुळे देशाचे आधारस्तंभ असलेल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xuJQT9
via nmkadda