Advertisement
केरळचे (kerala) मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी मंगळवारी सांगितले की, तांत्रिक, पॉलिटेक्निक आणि मेडिकलसह सर्व उच्च शिक्षण संस्थांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ४ ऑक्टोबरपासून संस्था सुरू करण्याची () परवानगी असेल. मात्र, मुख्यमंत्र्यांनी हेही सांगितले की संस्था पुन्हा सुरू करणे ही अटींच्या अधीन असेल. सर्व अंतिम वर्षाचे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांनी लसीकरणाचा किमान पहिला डोस घेतला असेल तरच ती संस्था सुरू करण्याची परवानगी मिळणार आहे. म्हणूनच, अंतिम वर्षातील सर्व विद्यार्थी, अध्यापक आणि पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे कर्मचारी यांनी या आठवड्यात लसीचा पहिला डोस घ्यावा, असे पिनरई विजयन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्यांनी लस त्वरित घ्यावी, असे सांगतानाच ते पुढे म्हणाले की, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे आणि म्हणूनच, शाळेतील शिक्षकांनी देखील या आठवड्यापर्यंत त्यांचे लसीकरण पूर्ण केले पाहिजे. त्यांनी सार्वजनिक आणि उच्च शिक्षण विभागांना आवश्यक ती व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आणि सांगितले की लसीकरणात शालेय शिक्षकांना प्राधान्य दिले जाईल. संबंधित विभागांनी दहा दिवसांच्या आत आवश्यक पावले उचलण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. दरम्यान, ५० टक्के क्षमतेसह १५ सप्टेंबरपासून दिल्ली विद्यापीठात वर्ग सुरू होणार आहेत. डीयूने तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत आणि १५ सप्टेंबरपासून पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के क्षमतेसह ग्रंथालय, प्रयोगशाळा, वर्ग खोली उघडण्याचे आदेश दिले आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nr997l
via nmkadda