Advertisement
वृत्तसंस्था, चेन्नई तामिळनाडूमध्ये आता वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 'नीट' (NEET) ऐवजी बारावीच्या गुणांवर आधारित प्रवेश () दिले जातील. या संदर्भातील विधेयकाला तमिळनाडू विधानसभेने सोमवारी मंजुरी दिली. 'नीट'चा निकाल काय लागेल, याला घाबरून एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर हा मुद्दा विधानसभेमध्ये खूपच गाजला. विरोधी पक्ष असलेल्या अण्णा द्रमुकने सरकारला यावरून सोमवारी धारेवर धरले. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी सोमवारी 'नीट' परीक्षेशिवाय बारावीच्या गुणांच्या धर्तीवर वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्यासाठीचे विधेयक सादर केले. या विधेयकाला अण्णा द्रमुकसह सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला. काँग्रेसनेही विधेयकाला पाठिंबा दिला. भाजपने मात्र विधेयकावर बहिष्कार घातला. दंतशास्त्र, होमिओपॅथी या विषयांना आता बारावी परीक्षेच्या गुणांवर आधारित प्रवेश मिळणार आहेत. सालेम जिल्ह्यात १९ वर्षाच्या धनुष या युवकाने रविवारी आत्महत्या केली. विरोधी पक्षनेते के. पलनीस्वामी यांनी हा विषय विधानसभेमध्ये मांडला.'नीट' रद्द करण्याचे आश्वासन देऊनही ते पाळण्यात आलेले नाही, अशी टीका त्यांनी केली. धनुषच्या आत्महत्येनंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सांगितले, की 'नीट'विरोधातील कायदेशीर संघर्ष राज्यात सरकारस्थापनेनंतर आमचा सुरू झाला आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल बनविण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. याची जाणीव ठेवून हे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकार 'नीट' रद्द करेपर्यंत संघर्ष सुरू राहील.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Eiz2w0
via nmkadda