Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २९, २०२१ WIB
Last Updated 2021-09-29T06:43:51Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

पालकांना भुर्दंड; शाळा सुरु झाल्यानंतर बसभाड्यात ३० टक्के वाढ अटळ Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, मुंबई वाढलेले डिझेल दर आणि सरकारी दरबारी झालेली विद्यार्थी वाहतूकदारांची उपेक्षा यांमुळे शालेय बसभाड्यामध्ये ३० टक्के भाडेवाढ करण्यात येणार आहे. शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थी वाहतुकीची संख्या लक्षात घेऊन ही भाडेवाढ केव्हा लागू करायची यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघाकडून स्पष्ट करण्यात आले. मार्च २०२०मध्ये डिझेल प्रतिलीटर ६८ रुपये होते. सध्या हे दर ९७ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. बस अनुज्ञप्तीची वैधता पूनर्जीवित करण्यासाठी करोनापूर्वी येणारा ६०० रुपयांचा खर्च सध्या दोन हजारांवर पोहोचला आहे. करोनानंतर सुरुवात करताना सर्वच क्षेत्रांत दरवाढ झाल्याने शालेय विद्यार्थी वाहतूकदारांनादेखील वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रिक्षाचालकांच्या धर्तीवर विद्यार्थी वाहतूकदारांना आर्थिक मदत मिळावी, उभ्या असलेल्या शालेय बसना करमाफी व पार्किंग दरात सूट मिळावी, आदी या विद्यार्थी वाहतूकदारांच्या मागण्यात होत्या. परंतु सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा फटका पालक आणि विद्यार्थी वर्गाला बसणार आहे. सध्या विद्यार्थी बसवाहतुकीचे किमान दर ८०० ते १,००० रुपये आहेत. ३० टक्के भाडेवाढीनंतर ते १,००० ते १,३००वर पोहोचतील. वाहतूकदारांना अस्तित्व टिकवण्यासाठी ही भाडेवाढ अटळ असेल, असे अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघाचे प्रसिद्धीप्रमुख योगेश कांबळे यांनी सांगितले. करोनाकाळात विद्यार्थी वाहतूकदार वर्ग दुर्लक्षित राहिला. सरकारी मदतीसाठी अनेकदा परिवहन विभागाच्या गाठीभेटी घेतल्या. मात्र दरवेळी केवळ आश्वासने देण्यात आली. आता करोनानंतर शाळा सुरू झाल्याच्या घोषणेनंतरदेखील सरकारकडून विद्यार्थी वाहतूकदारांसाठी कोणताही दिलासा देण्यात आला नाही. यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थीसंख्येचे प्रमाण लक्षात घेऊन शाळा-पालक यांच्याशी समन्वय साधून भाडेवाढीचा अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मुंबईसह राज्यातील अनेक शहरांतील उभ्या असलेल्या शालेय बसचा टॅक्स भरला नसल्याचे सांगत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने मेमो काढला आहे. शाळा सुरू होत असताना ही कारवाई होत असल्याने विद्यार्थी वाहतूकदारांमध्ये असंतोष खदखदत आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mbubEs
via nmkadda