Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ३०, २०२१ WIB
Last Updated 2021-09-30T08:43:45Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

अकरावीचा प्रवेशगोंधळ; कोट्यातील जागा नसल्याचा गुणवंत विद्यार्थ्यांना फटका Rojgar News

Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई अकरावी ऑनलाइन प्रवेशात (FYJC Online Admission 2021) कॉलेजांमधील विविध कोट्यांच्या जागा केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेत समाविष्ट होत नसल्याचा फटका गुणवंत विद्यार्थ्यांना बसत आहे. यामुळे पाच ते सहा फेऱ्यांनंतरही अनेक विद्यार्थी प्रवेशाविना असल्याचा आरोप होत आहे. २६ जून २९९७च्या शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार अकरावीचे सर्व प्रवेश गुणवत्तेच्या आधारे आणि ऑनलाइन पद्धतीने करण्यास सुरुवात झाली. यामध्ये कॉलेजांतील इनहाऊस, अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यातील जागा राखीव ठेवण्यात आल्या असून, त्यांवरील प्रवेश कॉलेजस्तरावर घेण्यात येतात. या जागांमधील रिक्त जागा कॉलेजांनी वेळावेळी केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेत समर्पित कराव्यात, असे निर्देश आहेत. मात्र शेवटची फेरी पार पडेपर्यंत या जागा दिल्या जात नाहीत. यामुळे विद्यार्थी त्यांना पाहिजे त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकत नाहीत. ज्या भागांमध्ये ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया पार पडते तेथे चांगले गुण मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा अशी अपेक्षा असते. अनेकदा पहिल्या फेरीत प्रवेश मिळाला नाही म्हणून विद्यार्थी दुसऱ्या फेरीत पाहिजे त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी पुन्हा अर्ज करतो. त्यावेळेस कोट्यातील सर्व जागा केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेत समर्पित न झाल्याने कमी जागांवर अधिक स्पर्धा होते आणि हा विद्यार्थी पुन्हा वंचित राहतो. मुंबई विभागात चार फेऱ्यांनंतरही इनहाऊस, अल्पसंख्याक, व्यवस्थापन कोट्यातील सुमारे ३१ हजार ३२६ जागा रिक्त आहेत. त्या प्राधान्य फेरीच्या आधी किंवा तिसऱ्या फेरीच्या आधी केंद्रीय प्रवेशप्रक्रियेत समाविष्ट झाल्या असत्या तर एवढ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची समान संधी मिळू शकली आहे. अनेक कॉलेजांनी कोट्यातील जागा केंद्रीभूत प्रवेशप्रकियेत समर्पित केलेल्या नसल्यामुळे भविष्यात त्या रिक्त राहतील आणि काही विद्यार्थी त्या कॉलेजांमध्ये प्रवेशापासून वंचित राहतील, अशी भीती व्यक्त होत आहे. शासनाच्या निर्णयानुसार केंद्रीभूत प्रवेशप्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच कोट्यातील प्रवेशप्रक्रिया पूर्ण करून त्या जागा केंद्रीय कोट्यात समर्पित करणे अपेक्षित असते. मात्र तसे होत नसल्याने विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत असल्याचे शिक्षण सुधारणा मोहिमेच्या संचालक वैशाली बाफना यांनी सांगितले. ही प्रवेशप्रक्रिया राबविण्यासंदर्भात केंद्रीय प्रवेश समितीला अधिकार देण्यात आले आहेत. मात्र समितीकडून शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. शिवाय न्यायालयाच्या विविध निर्णयांचाही अवमान होत असल्याचे पत्र बाफना यांनी शिक्षण संचालकांना लिहिले आहे. आतापर्यंत कोट्यात झालेले प्रवेश कोटा जागा प्रवेश समर्पित रिक्त इनहाऊस २०,७६५ ८,८०९ ६,०२९ ५,९२७ अल्पसंख्याक ८८,०६६ ३१,९६५ ३९,८५४ १६,२४७ व्यवस्थापन १५,८७० ५,८२९ ८८९ ९,१५२


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zWat4D
via nmkadda