Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर ०२, २०२१ WIB
Last Updated 2021-09-02T11:44:00Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

राज्यातील शाळा कधी सुरू होणार? निर्णय दोन दिवसांत Rojgar News

Advertisement
School Reopening Update: महाराष्ट्रातील शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय दोन दिवसात घेतला जाण्याची शक्यता आहे. शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये ऑफलाईन वर्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकार सध्याच्या कोविड १९ परिस्थितीचा आढावा घेणार आहे. शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी, २ सप्टेंबर २०२१ रोजी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. अनेक राज्यांमधील शाळा पुन्हा सुरू झाल्या असल्या तरी, महाराष्ट्र सरकारने अद्याप राज्याच्या शहरी भागातील शाळा पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला नाही. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, सरकार नवीन एसओपी आणि शाळा पुन्हा सुरू करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांवर लवकरच चर्चा करेल. त्यांनी आश्वासन दिले की विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे आणि महाराष्ट्रात शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेताना विचार केला जाईल. महाराष्ट्र शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत बच्चू कडू म्हणाले, "अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र, त्यावर २ दिवसात बैठक होणार आहे. उर्वरित राज्यात शाळा सुरू झाल्या आहेत, आपल्या राज्यातही शाळा सुरू झाल्या पाहिजेत आणि ही प्रत्येकाची भावना आहे. पण सध्या कोविड १९ च्या रुग्णांची संख्या केरळनंतर महाराष्ट्रात वाढत आहे. त्यामुळे हा सर्व विचार केल्यानंतर बैठकीत निर्णय घेतला जाईल. " सरकार लवकरच महाराष्ट्र शासन शाळा पुन्हा उघडण्याशी संबंधित एसओपी आणि मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल. ५० % क्षमतेसह आणि ऑनलाइन वर्ग सुरू ठेवून शाळा पुन्हा सुरू होतील अशी अपेक्षा आहे. अंतिम निर्णयाची अद्याप प्रतीक्षा आहे. करोना व्हायरस संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊनच्या आधी गेल्या वर्षी मार्चमध्ये शाळा बंद करण्यात आल्या होत्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी विविध राज्यांमध्ये शाळा पुन्हा सुरू करण्यासंबंधी कोविड स्थितीचा आढावा घेतला आणि शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण मोहिमेला प्राधान्य दिले. तज्ञांनी सांगितले आहे की शाळा पुन्हा सुरू होण्यापूर्वी शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आधी लसीकरण झाले असले पाहिजे. गेल्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रात ४,१९६ नवीन कोविड -१९ संक्रमित रुग्णांची नोंद झाली आणि १०४ जणांचा मृत्यू झाल्यामुळे संक्रमणग्रस्तांची संख्या ,६४,६४,८७६ झाली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2V7zprk
via nmkadda