Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर २५, २०२१ WIB
Last Updated 2021-09-24T18:43:41Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर, शुभम कुमार देशात पहिला Rojgar News

Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून २०२०मध्ये घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ७६१ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे. या परीक्षेमध्ये बिहारचा आणि आयआयटी मुंबईतून पदवीधर झालेला शुभम कुमार देशात पहिला आला आहे. तर महाराष्ट्रातील नागपूरची मृणाली जोशी देशात ३६वी आली असून अहमदनगरचा विनायक नरवडे देशात ३७वा आला आहे. ९५व्या क्रमांकावर विनायक महामुनी आहे. भोपाळच्या जागृती अवस्थीने दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर अंकिता जैननं तिसरा क्रमांक पटकावला आहे. मुलींमध्ये जागृती देशात पहिली आली आहे. २४ वर्षीय जागृतीने इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. २०२० साली यूपीएससीकडून घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. आयोगाने ८३६ जागांसाठी झोतलेल्या या परीक्षेतून ७६१ पात्र उमेदवार मिळाले आहेत. याचबरोबर १५० जणांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात आली आहे. आयोगाने दिलेल्या जागांमध्ये १८० आयएएस, ३६ भातीय परदेश सेवा, २०० आयपीएस, ३०२ गट ‘अ’, ११८ गट ‘ब’ सेवांची पदे आहेत. यंदा या परीक्षेला सुमारे १० लाख ४० हजार ६० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ४ लाख ८२ हजार ७७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातून १० हजार ५६४ विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले होते. यातून दोन हजार ५३ विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन अंतिम ७६१ जणांची यादी जाहीर करण्यात आली. यंदाच्या निकालात मुलींची संख्या वाढल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. अंतिम यादीत ५४५ पुरुष तर २१६ महिला उमेदवारांचा समावेश आहे. तर पहिल्या २५मध्ये १३ पुरुष आणि १२ महिलांचा समावेश आहे. याचबरोबर २५ उमेदवार हे दिव्यांग्य प्रवर्गातील आहेत. पहिल्या २५ आलेल्या विद्यार्थ्यांची पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण हे प्रामुख्याने आयआयटी, एनआयटी. बिट्स, एनएसयूटी, डीटीयू, मुंबई विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ अशा नामांकित संस्थांमधून झाले आहे, असे आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. .. अमेरिकेची नोकरी सोडली अन् अधिकारी झाला. सकारात्मक विचार करीत, मनलावून स्व अभ्यास केल्यास यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळवणे शक्य आहे, असे अमेरिकेतील नोकरी सोडून परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विनायक नरवडे याने सांगितले. मुळचा नगरचा असणाऱ्या सीओईपीतून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. त्यांनतर विनायकने कोलंबिया विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर, काही काळ आयटी कंपनीत नोकरी केली. त्याचवेळी त्याला सनदी अधिकारी होउन, देशसेवा करण्याची इच्छा झाली. त्याने वेळ वाया न घालवता २०१८ मध्ये अभ्यासाला सुरुवात केली. दिवसाला साधारण १२ ते १३ तास अभ्यास केल्यामुळे, दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवता आले. २१ वर्षीय निताशाचे पहिल्या प्रयत्नात यश अभ्यासात सातत्य ठेवून, नियोजन केल्यास केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेता यश मिळवता येईल. त्यासाठी आपल्या छंद सोडण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती नागरी सेवा परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होणाऱ्या पुण्याच्या नितीशा जगतापने दिली. सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड असल्याने, हे यश प्राप्त करता आले, असे नितीशाने सांगितले. नितीशा केवळ २१ वर्षांची असून, बीए सायकोलॉजीमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिने १९९ वा क्रमांक मिळवला आहे. तर परीक्षेच्या पूर्वी सोशल मीडियाचा वापर थांबवला. केवळ नोट्स आणि अभ्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर केला. अभ्यास करतांनाही वेळ मिळाल्यावर हॉलिवूडचे सिनेमे बघितले. कोणत्याही गोष्टीला बंदी घातली नोही. मी शिकून मोठ्या पदावर कार्य करावे, अशी माझी आजी, आई-बाबा यांची तीव्र इच्छा होती. आज ती पूर्ण झाल्याने, भरपूर आनंद झाला आहे, असेही ती म्हणाली. वाय. पी. सिंग यांच्या मूलीचे यश माजी आयपीएस अधिकारी वाय. पी. सिंग यांची मुलगी इशा सिंग हिने १९१व्या क्रमांक मिळवून ही परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. वडिलांचा आदर्श घेऊन इशानेही आयपीएस अधिकारी होण्याचे ठरविले होते. विधीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने ही परीक्षा दिली आणि आता मिळालेले यश हे लहानपणापासून वडिलांकडून मिळालेल्या बाळकडूंच्या आधारे मिळाल्याचे तिने ‘मटा’ला सांगितले. वडील आयपीएस अधिकारी असताना त्यांनी सुरू केलेला लढा आता पुढे नेण्याचे काम मी करणार असल्याचेही तिने सांगितले. स्वअभ्यासातून यश वाचन, लिखाण, चित्रकला, स्वअभ्यास अशा छंदांमुळे यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळवता आले आहे. माझ्या आई-वडिलांनी मला माझ्या आवडीप्रमाणे शिक्षण घेण्याची संधी दिल्याने, आज सनदी अदिकारी म्हणून लोकसेवा करायची संधी मिळाली आहे, असे परीक्षेत देशात ३६ व्या क्रमांकाने आणि राज्यात पहिल्या आलेल्या मृणाली जोशी हीने सांगितले. मृणालीने हे य़श २४ व्या वर्षी मिळवले आहे. मृणालीने दुसऱ्या प्रयत्नात यश प्राप्त केले आहे. मृणालीने तिचे बारावीपर्यतचे शिक्षण अभिनव विद्यालयातून, तर बीए (ईकॉनॉमिक्स) फर्ग्युसन महाविद्यालयातून २०१८ मध्ये पूर्ण केले आहे. मृणालीचे वडील अविनाश जोशी आणि मीनल जोशी हे दोघेही आयआयटीआयन आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3i1f2nR
via nmkadda