Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबई महानगर क्षेत्रासह पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महानगरपालिका क्षेत्रात अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी ( admission 2021 ) आज, १७ सप्टेंबरपासून अकरावी प्रवेशासाठी विशेष फेरीचे (FYJC )आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत प्रवेश निश्चित होऊनही ज्यांनी प्रवेश नाकारले आणि ज्यांना प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्याना या विशेष फेरीत सहभागी होता येणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रात अद्याप अकरावीच्या लाखो जागा रिक्त असून विद्यार्थी आजपासून ऑनलाइन अर्ज करू शकतील. अर्ज करण्याची मुदत २० सप्टेंबरपर्यंत असून या दरम्यान बायफोकल शाखेसाठीही यात अर्ज करता येणार आहेत. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना कोणते कॉलेज मिळाले आहे हे २२ सप्टेंबरला समजणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इनमध्ये कॉलेज वाटपाविषयी कळविले जाईल, असे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेण्यासाठी २५ सप्टेंबरपर्यंत मुदत असून प्रवेशानंतर रिक्त जागांचा तपशीलही २५ सप्टेंबरला रात्री उशिरा वेबसाइटवर जाहीर केला जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2XnOtlF
via nmkadda