Advertisement
राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये () २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेतंर्गत यंदा दोन लाख ८८ हजार ५८८ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता शनिवारी ४ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर झाली. प्रवेश प्रक्रियेतंर्गत यापूर्वी प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे आणि प्रवेश अर्जातील माहितीत बदल करण्यासाठी शुक्रवार ३ सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. ३ सप्टेंबर २०२१ पर्यंत प्रवेश अर्ज निश्चित केलेले उमेदवार त्यांच्या प्रवेश खात्यात प्रवेश करुन (Login) अंतिम गुणवत्ता क्रमांक तपासू शकतात. गुणवत्ता यादीत समाविष्ट उमेदवारांना SMS व्दारे गुणवत्ता क्रमांक कळविण्यात आला आहे. यानंतर ६ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता प्रथम फेरीसाठी संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना SMS व्दारे कळविण्यात येईल व निवडपत्र (Allotment Letter) उमेदवारांच्या प्रवेश खात्यात उपलब्ध करुन देण्यात येईल. ७ ते ११ सप्टेंबर २०२१ दरम्यान पहिल्या प्रवेशफेरीसाठी निवड झालेल्या संस्थेत उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही पूर्ण करायची आहे. ३ सप्टेंबर २०२१ पूर्वी प्रवेश अर्ज सादर करु न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर २०२१ दरम्यान ऑनलाइन पध्दतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरूस्ती (Edit) करणे व प्रवेश अर्ज शुल्क भरणे साठी संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WVdOmP
via nmkadda