Advertisement
देशभरात शाळा सुरू करण्यासंबंधी सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. दिल्लीतल्या बारावीच्या विद्यार्थ्याने याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणीत नकार देताना सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केली की याचिका प्रचारासाठी दाखल झाली, असं आम्ही म्हणणार नाही, पण तुम्ही शिक्षणावर लक्ष देणं योग्य आहे. प्रत्येक राज्यातील सरकार परिस्थितीनुरुप निर्णय घेत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा टप्प्याटप्प्याने उघडण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर विचार करण्यास नकार देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की हे काम राज्यांचे आहे आणि आम्हाला यात दखल द्यायला नको. करोनाकाळात बंद असलेल्या शाळा प्रत्यक्ष उघडण्यास राज्यांना आम्ही निर्देश देऊ शकत नाही. करोनाचा धोका कुठे अधिक आहे किंवा करोनासंक्रमित रुग्णांची संख्या कुठे अधिक आहे, हे आम्हाला माहिती नाही. कोर्टाने असंही निरीक्षण मांडलं की मुलांनी पुन्हा शाळेत जाण्याची आवश्यकता आहे, याबाबत दुमत नाही, मात्र यावर राज्य सरकारांनी निर्णय घ्यायला हवा. दिल्लीत आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सध्या बंदच दरम्यान, दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने (DDMA)ज्युनियर वर्गांसाठी (नर्सरी ते आठवी पर्यंत) शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. डीडीएमएने जाहीर केलेल्या सुचनेनुसार सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन वर्ग सध्या बंदच राहणार आहेत. विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन माध्यमातून सुरु राहणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3EzjWlT
via nmkadda