Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर ०४, २०२१ WIB
Last Updated 2021-10-04T11:43:28Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

राष्ट्रीय बाल सुरक्षा पथके ठेवणार शाळांवर वॉच; आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती Rojgar News

Advertisement
मुंबई: करोनाकाळानंतर सोमवारपासून राज्यभरात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू झाले आहेत. शाळांनी कोविड-१९ सुरक्षिततेच्या काय उपाययोजना करावयाच्या आहेत, आपली जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडणार आहेत, शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे राज्य सरकार कशा पद्धतीने लक्ष देणार आहे, याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. स्व-नियंत्रण खूप महत्वाचे आहे, शाळांचे सॅनिटायझेशन, शिक्षकांचे लसीकरणाविषयी काही महत्त्वाचे मुद्दे टोपे यांनी मांडले. टोपे म्हणाले, 'शिक्षकांचे पूर्णपणे लसीकरण करूनच शाळा सुरू केल्या पाहिजेत, असे निर्देश आम्ही दिले आहेत. SOP मध्ये तसा उल्लेख आहे. शाळा निर्जंतुक असायला हव्यात. सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे आदि सर्व कोविड सुसंगत वागणूक असली पाहिजे. जि. प. शाळा, खासगी शाळांनी या दृष्टीने नियोजन केले पाहिजे. स्व-नियंत्रण हे सर्वात महत्त्वाचे आहे.' 'राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रमांतर्गत () प्रत्येक शाळेला डॉक्टरच्या पथकाने तपासणी करावी, अशी अपेक्षा आहे. आरोग्य विभागाने या पथकांना तशा सर्व सूचना केलेल्या आहेत.' असेही टोपे यांनी सांगितले. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सोमवारी विद्यार्थी-पालकांना उद्देशून संवाद साधला. एकदा उघडलेल्या शाळा बंद होऊ द्यायच्या नाहीत असा निर्धार करा, असे आवाहन ठाकरे यांनी शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांना केले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Y9mQwV
via nmkadda