Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर ०८, २०२१ WIB
Last Updated 2021-10-08T14:43:38Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

महाविद्यालये सुरु करण्याबाबत उपमुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा Rojgar News

Advertisement
College Reopening 2021: राज्यभरातील शाळा सुरु झाल्यानंतर आता महाविद्यालये कधी सुरु होणार? असा प्रश्न विचारला जात आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील महाविद्यालये दिवाळीनंतरच सुरु होणार आहेत. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी महाविद्यालये सुरु होण्याबाबत महत्वाची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीत पुण्यातील ग्रामीण भागातील महाविद्यालयं सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला. अजित पवार यांनी घेतलेल्या या निर्णयानुसार पुण्याच्या ग्रामीण भागातील महाविद्यालयं सोमवारपासून सुरू होणार आहेत. मात्र, ही महाविद्यालयं सरू करत असताना विद्यार्थ्यांचं लसीकरण होणं अत्यंत गरजेचं असल्याचे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. ज्युनिअर कॉलेजची भूमिका सीनिअर कॉलेजांना जोडलेल्या ज्युनिअर कॉलेजांनी इतक्यात प्रत्यक्ष वर्ग सुरू करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. काही कॉलेजांमध्ये निर्जंतुकीकरणाचा पहिला टप्पा पार पडला आहे. आणखी एक टप्प्यानंतर आठवड्याची प्रतीक्षा करून ज्युनिअर कॉलेज सुरू करण्याचा विचार आहे. याचबरोबर काही कॉलेजांतील कर्मचारी निवडणूक कामांना नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांना परत बोलावण्यात आले आहे. ते रुजू झाल्यानंतर आठवडाभरात कॉलेज सुरू करण्याचा विचार असल्याचेही सांगण्यात येत आहे. मुंबईतील कॉलेजांमध्ये बहुतांश विद्यार्थी हे लोकलने प्रवास करून येतात. या सर्व विद्यार्थ्यांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करू नये असे सांगण्यात आले आहे. तसेच या विद्यार्थ्यांच्या दोन लसमात्रा न झाल्याने ते लोकल प्रवासासाठी पात्रही असणार नाहीत. यामुळे कॉलेजपासून लांब राहणारे बहुतांश विद्यार्थी हे प्रत्यक्ष हजर होतील का?, याबाबत प्राचार्यांनी साशंकता व्यक्त केली आहे. या सर्व बाबींचा सरकारने विचार करावा, अशी सूचनाही काही प्राचार्यांनी केली आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइनही ‘एआयसीटीईने नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने कॉलेज सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, ऑफलाइन कॉलेज सुरू केल्यानंतर नेमका किती विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा याबद्दल विचारविनमय सुरू आहे,’ अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. तर कॉलेजांबरोबर वसतिगृहांबाबत आराखडा तयार करण्याची सूचना करण्यात आली असून, अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल, असे त्यांनी या वेळी सांगितले; तसेच टप्प्याटप्याने वर्ग सुरू केले जातील, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FvNrph
via nmkadda