Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनाकाळात तब्बल दीड वर्षानंतर बुधवारी कॉलेजमध्ये पहिली घंटा झाली आणि शहरातील कॉलेज कॅम्पस विद्यार्थ्यांनी गजबजले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. करोना लशीचे दोन डोस घेतलेले विद्यार्थी कॉलेजांमध्ये ऑफलाइन उपस्थित राहू शकणार आहेत. त्यासाठी कॉलेज विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागासोबत बैठक घेऊन कॉलेज विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येईल. या मोहिमेतून प्रत्येक विद्यार्थ्याला लस उपलब्ध होईल, याची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्या विद्यार्थ्यांनी दोन डोस घेतले आहेत, त्यांनीही सामाजिक अंतर राखून, मास्क लावून वर्गात उपस्थिती लावावी. कॉलेजांनीही विद्यार्थी-पालक यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करावा, असेही सामंत यांनी सांगितले. शिक्षकांना प्रशिक्षण 'विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयातील नवीन कल्पना शिकवाव्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा न्यूनगंड कमी केला पाहिजे. त्यांना इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलता यावे, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे यासाठी पुण्यातील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲन्ड रिसर्च (आयसर) आणि पाचगणी इनिशिएटिव्ह ऑफ चेंज इन इंडिया या संस्थेने महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेसोबत राज्यातील शिक्षकांच्या प्रशिक्षणासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार केला.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nfF60A
via nmkadda