Advertisement
महाविद्यालये सुरू झाली असली तरी विद्यार्थ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा झाली आहे. जे विद्यार्थी कॉलेजसाठी प्रवास करत आहेत, त्यांनी त्यांचे व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट दाखवल्यावर तिकीट द्यावे, अशी मागणी करणारे पत्र आम्ही मुख्य सचिवांना दिले आहे. ही समस्या येत्या दोन-तीन दिवसात मार्गी लागणार आहे. , अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी दिली. राज्यातील महाविद्यालये बुधवारपासून ऑफलाइन पद्धतीने सुरू झाली. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सिडनहॅम महाविद्यालयात उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तत्पूर्वी त्यांनी महाविद्यालयातील सॅनिटायझेशन आणि अन्य व्यवस्थेचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या मनातील करोनाची भीती काढायला हवी. त्यासाठी विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुक्तपणे वावरता येण्याासाठी त्यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असणे आवश्यक आहे. राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबवणार आहे, असे सामंत यांनी सांगितले. बीएचा कोर्स तीन वर्षांचाच बीए अभ्यासक्रमाचा कोर्स तीन वर्षे कालावधीचाच राहणार आहे. बीए झाल्यावर एक वर्ष जर बीएमधील रिसर्च विद्यार्थ्यांनी केला तर बीए इन रिसर्च ही चार वर्षांची पदवी मिळणार आहे. जर कोणी गैरसमज पसरवत असतील की हा अभ्यासक्रम चार वर्षांचा आहे किंवा तीन वर्षांचा अभ्यासक्रम रद्द होणार आहे, त्या त्यावर विश्वास ठेवू नका, असं आवाहन सामंत यांनी विद्यार्थ्यांना केलं.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vtrNgx
via nmkadda