Advertisement
दरवर्षी एप्रिलमध्ये परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना सुटी लागते. मात्र, शिक्षकांना एक मेपर्यंत शाळेत हजेरी लावणे सक्तीचे असते. यातच यंदा एप्रिल महिन्यात शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी वर्ग भरवण्याच्या सूचना करण्यात आल्या. यावरून राज्यभरातून नाराजीचा सूर उमटत आहे. यामुळे संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी २०२२ची उन्हाळी सुटी व आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण संचालनालयाकडून शालेय शिक्षण विभागाकडे करण्यात आले आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/schools-in-maharashtra-to-get-summer-vacation-from-may-2nd/articleshow/90582873.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/schools-in-maharashtra-to-get-summer-vacation-from-may-2nd/articleshow/90582873.cms