Advertisement
सध्या प्रवेशांचा काळ सुरू असून, विद्यार्थ्यांना घरापासून जवळ असलेल्या शाळेमध्ये प्रवेश देण्यावर पालकांचा कल असतो. परंतु, आपल्या जवळ असलेली खासगी शाळा मान्यताप्राप्त आहे का, या शाळेमध्ये सरकारच्या सर्व नियमांचे पालन होते का, याची पडताळणी केली जात नाही. परिणामी, शाळा अनधिकृत असल्याचे उघड झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होतो. यामुळे शाळांमध्ये प्रवेश घेताना ती अधिकृत असल्याची खात्री करून मगच प्रवेश घ्या, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/illegal-school-question-raise-of-5-thousand-students/articleshow/93126156.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/illegal-school-question-raise-of-5-thousand-students/articleshow/93126156.cms