Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ३१ मे, २०२१, मे ३१, २०२१ WIB
Last Updated 2021-05-31T05:47:03Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल परीक्षेविना? Rojgar News

Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई केंद्रीय शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल परीक्षेविना जाहीर होण्याची शक्यता आहे. मंडळाने शाळांना नुकत्याच पाठवलेल्या पत्रकात तीन पर्याय सुचविले आहेत. यातील एका पर्यायानुसार शाळांना इयत्ता नववी, दहावी आणि अकरावीच्या परीक्षांची माहिती एकत्रित करण्यास सांगितले आहे. याचबरोबर दहावीच्या गुणांचा तपशीलही मागविला आहे. यामुळे या तीन वर्षांच्या गुणांची सरासरी काढून निकाल जाहीर करणार का, यावर शिक्षण क्षेत्रात चर्चा सुरू आहे. बारावी परीक्षेबाबत काय धोरण स्वीकारावे यासाठी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी २३ मे रोजी देशातील राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांची बैठक घेतली होती. या वेळी बहुतांश राज्यांनी करोनाच्या संकटात परीक्षांचे आयोजन करण्याबाबत भीती व्यक्त केली होती. यामुळे देशभरात ज्युनिअर कॉलेजे असलेल्या केंद्रीय शिक्षण मंडळाला सर्व राज्यांनी हिरवा कंदील दाखविल्याशिवाय परीक्षांचे आयोजन करणे अवघड होणार आहे. यामुळे मंडळाचा बारावीचा निकाल परीक्षेविनाच जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्रीय मंडळाने सध्या दोन प्रस्ताव तयार केले आहेत. यात देशभरात ऑगस्टमध्ये मंडळाच्या १९ महत्त्वाच्या विषयांची परीक्षा घेण्यात यावी, अशी सूचना केली आहे. दुसऱ्या प्रस्तावात सविस्तर परीक्षा न घेता कमी वेळात बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारे परीक्षांचे दोन टप्प्यात नियोजन करण्यात यावे, अशी सूचना केली आहे. याबाबत राज्यांच्या सूचना मागविण्यात आल्या असून, अंतिम निर्णय एक जूनला होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शाळांना इयत्ता नववी, दहावी आणि अकरावीचे विद्यार्थ्यांचे गुण एकत्रित करून ठेवण्यास सुचविले आहे. मंगळवारी याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. यानंतर बहुतांश राज्यांतील बारावी निकालाचे सूत्र निश्चित होणार आहे. दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 'आयसीएसई'ही परीक्षेविना आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ 'आयसीएसई'नेही शाळांना पत्र लिहून अकरावी आणि बारावीच्या आतापर्यंतच्या परीक्षांचे गुण एकत्रित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wK5FOp
via nmkadda