Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ०४, २०२१ WIB
Last Updated 2021-08-04T10:43:37Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

FYJC सीईटीसाठी एका केंद्रावर ३०० विद्यार्थी Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीसाठी राज्य़ातून साधारण १२ लाख विद्यार्थी प्रविष्ट होणार असून, प्रत्येक परीक्षा केंद्रावर ३०० विद्यार्थ्यांप्रमाणे सीईटीचे नियोजन करण्यात येईल. सध्याच्या वेळापत्रकाप्रमाणेच २१ ऑगस्टलाच ही परीक्षा होणार असल्याचे स्पष्टीकरण राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी मंगळवारी दिले. राज्य मंडळाकडून अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीसाठी सुमारे ११ लाख ९६ विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे, तर काही विद्यार्थ्यांचे अर्ज शुल्क प्रक्रियेमुळे संगणकीय प्रणालीत अपडेट व्हायचे आहे. त्यामुळे या सीईटीसाठी राज्यातून सुमारे १२ लाख विद्यार्थी प्रविष्ट होतील, असा मंडळाचा अंदाज आहे. सीईटीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. राज्य मंडळाने अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचे निश्‍चित केले आहे. त्यानुसार मंडळाने सीईटी परीक्षेसाठी वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा २० जुलैपासून उपलब्ध करून दिली. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ही सुविधा २१ जुलैपासून काही दिवस बंद ठेवण्यात आली. त्यानंतर मंडळाने २६ जुलैपासून https://ift.tt/3y8QiQW या नव्या वेबसाइटवरून २ ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध करून देण्यात आली. त्यानुसार अकरावी सीईटीसाठी २० जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्यात आली. सोमवारी रात्रीपर्यंत ११ लाख ९६ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या अर्जाची माहिती संगणकीय प्रणालीत अपडेट होत असल्याने, राज्यातून बारा लाखांहून अधिक विद्यार्थी ऑफलाइन पद्धतीने सीईटी देतील. त्यामुळे राज्यात एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रविष्ट होण्याची ही पहिलीच वेळ राहणार आहे. मंडळाने सध्याच्या वेळापत्रकानुसार २१ ऑगस्ट रोजी सीईटी घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामध्ये काही बदल झाल्यास, त्याची माहिती आवश्यकतेप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती पाटील यांनी दिली आहे. .... घराजवळील परीक्षा केंद्र मिळणार राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अजूनही संपलेला नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांची सुरक्षित वातावरणात परीक्षा घ्यावी लागणार आहे. त्याचे नियोजन मंडळाकडून करण्यात येत आहे. सुरक्षित अंतराचे नियम पाळून एका परीक्षा केंद्रावर साधारण ३०० विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळीत परीक्षा केंद्र देण्याचा प्रयत्न मंडळाकडून करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lz3cUH
via nmkadda