Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट १२, २०२१ WIB
Last Updated 2021-08-12T05:43:43Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

अकरावी प्रवेश कसे होणार? नियमावलीबाबत शिक्षण विभागाने दिली माहिती... Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे उच्च न्यायालयाने अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्याचा निर्णय रद्द केल्यानंतर, आता शालेय़ शिक्षण विभागाकडून प्रक्रियेबाबतचे सविस्तर माहिती पत्रक येत्या दोन दिवसांत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरम्यान, या निर्णयापूर्वी ज्युनिअर कॉलेजांमध्ये अकरावी प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना सोमवारी १६ ऑगस्टपासून नोंदणी करण्याची सूचना अकरावी प्रवेश नियंत्रण समितीद्वारे केली आहे. त्यामुळे या वेळापत्रकात बदल होतो का, याकडे विद्यार्थी-पालकांचे लक्ष लागले आहे. सीईटी रद्द झाल्यामुळे, ज्युनिअर कॉलेजांमध्ये दहावीच्या गुणांवर अकरावीचे प्रवेश होणार आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने तयारी सुरू केली असून, प्रवेशासाठीच्या नियमावलींचे माहिती पत्रक येत्या दोन दिवसांत प्रसिद्ध केले जाणार आहेत, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित येणाऱ्या अकरावी प्रवेश नियंत्रण समितीद्वारे पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती अशा महानगरांमध्ये ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. सध्याच्या अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना सोमवारी १६ ऑगस्टपासून लॉग-इन आयडी तयार करून अर्जातील भाग एक भरायचा आहे. या भाग एकमध्ये विद्यार्थ्याला नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक अशी सर्वसाधारण माहिती भरायची आहे. दर वर्षी, दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अर्जातील भाग दोन भरण्याला सुरुवात होते. मात्र, यंदा दहावीचा निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना भाग एक आणि भाग दोन एकाच वेळी भरून नोंदणी करता येणे शक्य आहे. दोन्ही भाग एकाच वेळी भरल्याने, प्रवश प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होईल. त्यामुळे यंदा प्रवेश नियंत्रण समितीकडून प्रवेश प्रक्रियेबाबत प्रसिद्ध होणाऱ्या परिपत्रकाकडे विद्यार्थी-पालकांचे लक्ष लागले आहे. अधिक माहिती 11thadmission.org.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. ‘अकरावी प्रवेशाला अडचण नाही’ ‘राज्यात अकरावी प्रवेशासाठी कुठलीही अडचण येणार नाही. दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी जागेअभावी प्रवेशासपासून वंचित राहिले, असे होणार नाही. अकरावी सीईटी रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचे शुल्क परत मिळेल. तो त्यांचा अधिकार आहे,’ अशी माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jI1Qo6
via nmkadda