Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटीसाठी सुमारे १२ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. सीईटीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी कोणाचीही मागणी राज्य मंडळाकडे आलेली नाही. त्यामुळे आता अशी मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सोमवारी स्पष्ट केले. मंडळाने https://ift.tt/3y8QiQW या नव्या वेबसाइटवरून २ ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार अकरावी सीईटीसाठी २० जुलै ते २ ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण करण्यात आली. सोमवारी सायंकाळपर्यंत ११ लाख ९० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. रात्री बारापर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार असल्याने राज्यातून १२ लाखांहून अधिक विद्यार्थी नोंदणी करतील, असा अंदाज आहे. यामध्ये मुंबई विभागातून सर्वाधिक अडीच लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे समोर आले आहे. मंडळाने सध्याच्या वेळापत्रकानुसार २१ ऑगस्ट रोजी सीईटी घेण्याचे निश्चित केले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Vi1Bbc
via nmkadda