Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ०९, २०२१ WIB
Last Updated 2021-08-09T08:43:08Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

दहावीच्या गुणपत्रिका तयार! आजपासून वाटप Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, नाशिक राज्य मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांचे कामदेखील पूर्ण झाले आहे. मंडळाने विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका तयार केल्या असून, आजपासून (दि. ९) टप्प्याटप्प्याने शाळांमधून विद्यार्थ्यांना वितरित केल्या जाणार आहेत. त्यासाठी विभागीय मंडळातर्फे शाळांना ७ ऑगस्टपासून गुणपत्रिका देण्यास सुरुवात केली आहे. करोना संसर्गामुळे लागू असलेल्या निर्बंधांनुसार शाळेत गर्दी न करता व एकाचवेळी विद्यार्थ्यांना न बोलविता केवळ टप्प्याटप्प्याने वितरण करण्याचे निर्देश मंडळाने शा‌ळांना दिले आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे दोन आठवड्यांपूर्वी अंतर्गत मूल्यमापनानुसार दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे प्रथमच नाशिक विभागाचा ९९.९६, तर जिल्ह्याचा ९९.९७ टक्के निकाल लागला. विभागातील २ लाख १५५ प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ९३ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशासाठी 'सीईटी' होणार असून, त्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. मात्र, निकालाचे गुणपत्रक अद्याप विद्यार्थ्यांच्या हातात आलेले नाही. नियोजन दहावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाल्यानंतर गुणपत्रिका केव्हा मिळणार, याबाबत सातत्याने विचारणा होते. त्यातच यंदा अंतर्गत मूल्यांकनामुळे निकालात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त असल्याने, गुणपत्रिकेबाबत उत्सुकता अधिक आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत प्रत्येक वितरण केंद्राला जोडलेल्या शाळांची संख्या लक्षात घेऊन जास्त वितरण केंद्रे निर्माण करणे किंवा त्याच वितरण केंद्रांवर सुरक्षित अंतर ठेवून वितरण खिडक्यांची संख्या वाढवून गुणपत्रिका वितरित केल्या जात आहेत. पालक-विद्यार्थ्यांची एकाच वेळी गर्दी न होण्याबाबत शाळांनी नियोजन करावे. त्याचप्रमाणे गुणपत्रिका वितरणासाठी केंद्रावर स्थायी लिपीक व शिपाई पाठवावा, अशा सूचना विभागीय मंडळाने केल्या आहेत. ...असे आहेत निर्देश - शाळांनी ९ ऑगस्टला दुपारी तीन वाजेपासून वितरण करावे. - विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार नियमांचे पालन करून गुणपत्रिका द्याव्यात. - ठराविक दिवशीच शाळेत येऊन गुणपत्रिका घेण्याची सक्ती विद्यार्थ्यांना करू नये.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fKPGJZ
via nmkadda