Advertisement
वृत्तसंस्था, नवी दिल्ली 'करोनाची दुसरी लाट घातक असून, संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुलांना सर्वांत जास्त धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा सरकारने रद्द कराव्यात,' अशी मागणी काँग्रेस नेत्या प्रियांका वद्रा यांनी केली आहे. परीक्षांबाबचा निर्णय सरकार विनाकारण लांबवत असून, हा मुद्दा ताणत आहे, असा आरोपही त्यांनी केला. 'करोनाच्या सद्यस्थितीत परीक्षाकेंद्रांवर परीक्षा घेणे अतिशय अवघड आणि घातक ठरू शकते. सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून मुलांना परीक्षा देणे वाटते तितके सोपे नाही. मुलांच्या प्रकृतीला प्राधान्य देण्याऐवजी सरकार हा निर्णय विनाकारण लांबवत आहे,' अशी टीकाही प्रियांकांनी केली. 'ट्वीटर'च्या माध्यमातून भूमिका मांडताना प्रियांकांनी करोनालढ्यावरून मोदी सरकारलाही लक्ष्य केले. 'आपण कोणताही धडा का घेत नाही? बंदिस्त जागेमध्ये मुलांनी एकत्र जमणे करोनाचा प्रसार होण्यासाठी घातक ठरू शकते. यामुळे करोना वाढू शकतो,' अशी भीती प्रियांकांनी व्यक्त केली. 'सीबीएसई' बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. दरम्यान, विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. यामुळे जापर्यंत लसीकरण होत नाही, तोपर्यंत कोणतीही परीक्षा पारंपरिक पद्धतीने घेऊ नये असा सूर रविवारी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या देशभरातील शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीत उमटला. त्यामुळे बारावीची परीक्षाही पारंपरिक पद्धतीने न होता इतर पर्यायांच्या माध्यमातून होईल, असा अंदाज बांधण्यात येत आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2QQ2NAs
via nmkadda