Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट ०४, २०२१ WIB
Last Updated 2021-08-04T14:43:49Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटीशिवाय; उच्च शिक्षणमंत्र्यांची घोषणा Rojgar News

Advertisement
Degree College Admission Update: राज्य मंडळाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पदवीचे प्रवेश कसे होणार, सीईटी (CET For Degree Admsission) होणार का असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये होता. मात्र राज्यातील अव्यावसायिक (पारंपरिक) पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशांसाठी सीईटी घेतली जाणार नाही, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. सीईटीचे आयोजन आणि त्यानंतरच्या प्रवेशांसाठी लागणारा अधिकचा वेळ, कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवरील राज्यातील दळणवळणाचे निर्बंध, पावसाळा, तिसऱ्या लाटेची शक्यता आदी सर्व अडथळे लक्षात घेऊन पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशांसाठी सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करणे उचित राहणार नाही, यावर गुरुवारी दुपारी यासंदर्भात झालेल्या कुलगुरुंच्या बैठकीत एकमत झाले, अशी माहिती सामंत यांनी दिली. ते पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पदवी प्रथम वर्ष (FY BA, Bcom, Bsc) प्रवेशांसाठी शाखानिहाय उपलब्ध जागा आणि प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या याचा आढावा गुरुवारी झालेल्या कुलगुरुंसोबतच्या बैठकीत घेण्यात आला. बारावीत यंदा १३,४,९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. साधारणपणे १२ टक्के विद्यार्थी अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माण व वास्तुशास्त्र आदि अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. सद्यस्थितीत राज्यातील अकृषी विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाची प्रवेश क्षमता १२,११,६२० इतकी आहे. प्रवेश क्षमतेत करणार वाढ बारावीत विज्ञान शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ५,४१,१००८ इतकी असून विज्ञान शाखेची पदवीच्या प्रथम वर्षातील प्रवेशांची क्षमता ३,१३,१२० आहे. १२ टक्के विद्यार्थी अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे वळले तरी साधारणपणे १,६०,००० विद्यार्थ्यांना प्रवेश देणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रवेश क्षमतेत वाढ करणे आवश्यक असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित झाला. परिणामी विशेषत: शहरी भागातील महाविद्यालयातील प्रवेश क्षमतेत कमाल २० टक्के इतक्या मर्यादेत वाढ करण्याबाबत आदेश निर्गमित केले जाणार आहेत. परिणामी या महाविद्यालयांना अतिरिक्त विद्यार्थ्यांना सामावून घेता येईल. सीईटीची प्रक्रिया वेळखाऊ सीईटीसाठी प्रवेश परीक्षेची तारीख ठरवणे, अभ्यासक्रम निश्चित करणे, प्रश्नसंच, प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षेचे स्वरुप निश्चित करणे, संपूर्ण प्रक्रियेच्या आयोजनासाठी निविदा प्रक्रिया राबवणे, परीक्षेसाठी जाहिरात देणे, अर्ज मागवणे, प्रत्यक्ष परीक्षेचे आयोजन करणे, निकाल तयार करून जाहीर करणे आदी सर्व टप्प्यांसाठी किमान ४ महिन्याचा कालावधी आवश्यक होता. बारावीचा निकाल आधीच लांबलेला आहे. शिवाय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांनंतर प्रथम तसेच द्वितीय सत्रासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एकूण १८० शैक्षणिक दिवस पूर्ण होणे आवश्यक असल्याची अट आदी बाबी लक्षात घेऊन तसेच राज्यातील करोना निर्बंध, पावसाळा, तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन सीईटीचे आयोजन करणे उचित होणार नसल्याचे सामंत यांनी सांगितले. त्यामुळे पदवीचे प्रवेश बारावीच्या गुणांवरच होणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3A6mapR
via nmkadda