Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१, ऑगस्ट १२, २०२१ WIB
Last Updated 2021-08-12T13:43:51Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

देशातील १५कोटी बालके आणि तरुण शिक्षण व्यवस्थेबाहेर- धर्मेंद्र प्रधान Rojgar News

Advertisement
India system: साधारण १५ कोटी मुले आणि तरुण देशाच्या औपचारिक शिक्षण व्यवस्थेबाहेर आहेत अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री यांनी दिली. तसेच साधारण २५ कोटी लोकसंख्या साक्षरतेच्या मूलभूत व्याख्येच्या खाली असल्याचेही ते म्हणाले. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) आयोजित वार्षिक परिषदेदरम्यान प्रधान यांनी 'रोजगार निर्मिती आणि उद्योजकता' या विषयावर भाषण दिले. यावेळी त्यांनी हे मुद्दे मांडले. केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणाले, 'जर आपण सरकारी, खासगी आणि धर्मादाय शाळा, अंगणवाडी, उच्च शिक्षण संस्था आणि कौशल्याशी संबंधित संपूर्ण यंत्रणेत ३ ते २२ वयोगटातील मुले आणि तरुणांची संख्या पाहिली तर ही संख्या ३५ कोटी आहे. देशात या वयोगटाची लोकसंख्या ५० कोटी आहे. याचा अर्थ किमान १५ कोटी बालके आणि तरुण देशामध्ये औपचारिक शिक्षण व्यवस्थेच्या बाहेर आहेत.' देशातील १९ टक्के लोकसंख्या साक्षर असल्याचे स्वातंत्र्यानंतर झालेल्या जनगणनेमधून समोर आले होते. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देशात साक्षरता दर ८० टक्क्यांवर पोहोचला आहे. याचा अर्थ २० टक्के लोकसंख्या म्हणजेच साधारण २५ कोटी लोकसंख्या साक्षरतेच्या मूलभूत व्याख्येच्या खाली असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणाले. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे महत्त्व अधोरेखित करताना प्रधान म्हणाले की, हे केवळ एक दस्तऐवज नाही तर पुढील २५ वर्षांमध्ये जेव्हा आपल्या लोकसंख्येची १०० वर्षे पूर्ण करू तेव्हा ती उद्दिष्टे साध्य करण्याची एक ब्लूप्रिंट आहे. पहिल्यांदाच आमच्या सरकारने शिक्षणाबरोबर कौशल्य देखील जोडले आहे. हे उपजीविकेच्या दिशेने नवीन पुढाकार अधोरेखित करत असल्याचे प्रधान यावेळी म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3saRFw8
via nmkadda