Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१, सप्टेंबर १६, २०२१ WIB
Last Updated 2021-09-16T12:43:35Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

JEE Main परीक्षेत गैरप्रकार केलेल्या २० उमेदवारांचे ३ वर्षासाठी निलंबन, निकालही रोखले Rojgar News

Advertisement
2021 Result: परीक्षेत गैरप्रकार केल्याने नॅशनल टेस्टिंग एजन्सी(NTA) ने एकूण २० उमेदवारांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी भविष्यातील परीक्षेत बसण्यास बंदी घातली आहे. त्यांचे मुख्य परीक्षेचे निकाल देखील रोखण्यात आले आहेत. जेईई मुख्य परीक्षेच्या आधी किंवा नंतर उमेदवार कोणत्याही अनुचित माध्यमांचा (unfair means or UFM) वापर करताना आढळला तर त्याला जेईई मेनमध्ये बसण्यास ३ वर्षांसाठी बंदी घालण्यात येईल. तसेच संबंधित उमेदवारावर कायदेशीर कारवाई देखील केली जाईल असे जेईई मुख्य माहिती पुस्तिकेत जाहीर करण्यात आलेल्या नियमांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षेत गैरप्रकार केलेल्या उमेदवारांचे निकाल रद्द केले जातील आणि घोषित केले जाणार नाहीत असेही यामध्ये म्हटले आहे. त्याचप्रमाणे परीक्षाकेंद्रामध्ये अधिकृत उमेदवाराव्यतिरिक्त त्याच्या जागी दुसरा उमेदवार परीक्षा लिहीत असेल तर संबंधित उमेदवाराचा निकाल रद्द करण्यात येईल किंवा दिला जाणार नाही असेही त्यामध्ये म्हटले आहे. गैरप्रकार करताना आढळलेल्या २० जणांवर एनटीएने कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. या २० जणांना पुढील ३ वर्षे जेईई मुख्य परीक्षेत बसता येणार नाही. तसेच त्यांचा निकालही रोखण्यात आला आहे. संबधित गैरप्रकार कसा झाला? यात कोण सहभागी होते याचा तपास केला जाणार आहे. या परीक्षेत जेईई अॅडव्हान्ससाठी पात्र ठरण्यासाइी कट-ऑफ (jee main 2021 cut-off) ८७.८९९२२४१ इतका निश्चित झाला आहे, जो गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. सर्व श्रेणींमध्ये कट ऑफ कमी झाला आहे. यासोबतच एनटीएने मे २०२१मध्ये प्रस्तावित; पण करोनामुळे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या चौथ्या टप्प्यातील जेईई मेन २०२१मध्ये उपस्थित उमेदवारांची ऑल इंडिया रँक आणि परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर केली जाणार आहे. एनटीएने जाहीर केलेल्या सुचनेनुसार १८ उमेदवारांनी चौथ्या सत्राच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. यात राज्यातील पाच विद्यार्थ्यांचा तर चार आंध्र प्रदेश, दोन तेलंगण आणि उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येकी दोन उमेदवार आहेत. जेईई मेनचे आयोजन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि इतर अनेक सरकारी अनुदानित संस्थांमधील प्रवेशासाठी होते. जेईई मेनमध्ये उत्तीर्ण होणारे टॉप २.५ लाख विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स्डसाठी उपस्थित राहू शकतात. जेईई मेनचे चौथे सत्र २६, २७, ३१ ऑगस्ट आणि १, २ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. सत्र-चारमध्ये एकूण ७.३२ लाख उमेदवार उपस्थित होते. जेईई मुख्य पेपर मध्यम प्रमाणात अवघड होता. गणिताचा पेपर सर्व सत्रांमध्ये कठीण होता. तर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राची समीक्षा सोपी होती. यंदा देशातील ३३४ शहरांत ९२५ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nAibil
via nmkadda