Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर २०, २०२१ WIB
Last Updated 2021-10-20T08:43:11Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; २९.४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण Rojgar News

Advertisement
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यातील सर्व नऊ विभागीय मंडळातून १०,४७७ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती, त्यापैकी ३,०५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी २९.४ आहे. दहावीची लेखी परीक्षा २२ सप्टेंबर २०२१ ते ८ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. एक किंवा दोन विषयात उत्तीर्ण न होऊ शकलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या ४,३३६ आहे. हे विद्यार्थी २०२१-२२ मध्ये एटीकेटीद्वारे अकरावीच्या प्रवेशांना पात्र ठरतात. कुठे पाहता येईल निकाल? राज्य मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल बुधवार २० ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी १ वाजता जाहीर झाला. मंडळाच्या पुढील संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे. गुणपडताळणी कधी आणि कुठे? ऑनलाइन निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच २१ ऑक्टोबरपासून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांक व स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. या संकेतस्थळावर यासंबंधीची सर्व माहिती उपलब्ध आहे. या प्रक्रियांचे शुल्क देखील ऑनलाइन माध्यमातूनच भरायचे आहे. महत्त्वाच्या तारखा गुणपडताळणीसाठी अर्ज - २१ ऑक्टोबर २०२१ ते ३० ऑक्टोबर २०२१ उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतींसाठी अर्ज - २१ ऑक्टोबर २०२१ ते ९ नोव्हेंबर २०२१


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lZnU00
via nmkadda