Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर १५, २०२१ WIB
Last Updated 2021-11-15T09:43:51Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

आयआयटी-दिल्लीच्या विद्यार्थ्यांची हायब्रीड मोड परीक्षेवर नाराजी Rojgar News

Advertisement
नवी दिल्ली: इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT)दिल्ली तर्फे यावेळी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमातून परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना संस्थेतून आणि घरातून परीक्षा देण्याची सुविधा देण्यात आली आहे. दरम्यान ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या नियमांवर नाराजी व्यक्त केली आहे. परीक्षेच्या नियमांमुळे सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. ही सुविधा भेदभावपूर्ण असल्याचे सांगत अनेक विद्यार्थ्यांनी हायब्रीड स्वरुपात परीक्षा घेण्याचा हा नियम विद्यार्थ्यांना समान संधी देत नसल्याचे म्हटले आहे. कॅम्पसमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या विभागाची माहिती देऊन वर्गातच परीक्षा देण्यास सांगण्यात येत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी अद्याप कॅम्पसमध्ये आले नाहीत त्यांना ऑनलाइन माध्यमातून घरबसल्या परीक्षा देण्याची सुविधा देण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना समान संधी मिळत नाही . याप्रकरणी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन याचिका मोहीमही सुरू केली आहे. आतापर्यंत ६५० हून अधिक विद्यार्थ्यांनी त्यावर सही केली आहे. अनेक विद्यार्थी कॅम्पसमध्ये आले नाहीत. म्हणजे ते विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार घरूनच परीक्षा देऊ शकतात. ५० टक्के विद्यार्थी घरून परीक्षा देत आहेत. आणि उर्वरित विद्यार्थ्यांना संस्थेत परीक्षा देण्यास सांगणे हा भेदभाव करणारा निर्णय असल्याचे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन याचिकेत म्हटले आहे. परीक्षेसाठी चांगले वातावरण असणे अत्यंत गरजेचे आहे. आम्हाला संस्थेकडून परीक्षेची माहिती फार कमी वेळात देण्यात आल्याचेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान विद्यार्थ्यांनी घरी जाण्यासाठी महागडी तिकिटे खरेदी केली होती. याबाबत संस्थेने आधीच घोषणा करायला हवी होती असेही विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. संस्थेने फेटाळून लावले आरोप संस्थेच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. ही केवळ एकच अशी परीक्षा आहे ज्यामध्ये विद्यार्थी घरी बसून किंवा संस्थेत येऊन परीक्षा देऊ शकतात. यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. परीक्षेत भेदभाव किंवा पक्षपातीपणा केला जात नाही. जोपर्यंत विद्यार्थी संस्थेच्या कॅम्पसमध्ये आहेत, तोपर्यंत त्यांना परीक्षा देण्यास आणि वर्गात येण्यास कोणतीही अडचण येणार नाही. परीक्षा फक्त विद्यार्थ्यांसाठीच असतात आणि वर्गातील वातावरणात त्यासाठी अनुकूल आहे असे संस्थेचे शैक्षणिक अधिष्ठाता शंतनू राय यांनी म्हटले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DkbEx0
via nmkadda