TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

राज्यातील शाळांमध्ये 'माझे संविधान, माझा अभिमान' उपक्रम Rojgar News

Day: २६ नोव्हेंबर १९४९ हा दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. भारतीय संविधान ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे.घटनाकार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम घेत राज्यघटनेची निर्मिती केल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी गठीत समितीने ती स्वीकारली.त्यानंतर स्वतंत्र भारतीय राज्यघटना अंगिकृत व अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करण्यात आली. या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांमध्ये 'माझे संविधान,माझा अभिमान' उपक्रम राबविण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील माहिती दिली. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसह भारतीय संविधानाच्या निर्मितीत हातभार लावलेल्या त्या तमाम व्यक्तिमत्वांना अभिवादन करणे,आदरांजली वाहणे;त्याचप्रमाणे संविधानातील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे व त्यांना जागरूक नागरिक बनवणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. कायदे म्हणजे काय? कायदे कशासाठी? राज्यघटना नेमका काय प्रकार आहे?असे अनेक प्रश्न बालमित्रांना पडतात.भारतीय राज्यघटनेतील व्यापक मूलतत्त्वे, सर्वसमावेशकता विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत याअनुषंगाने 'माझे संविधान,माझा अभिमान' उपक्रम राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतल्याचे वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. स्वातंत्र्य, मूलभूत हक्क, कर्तव्ये, समता, न्याय, लोकशाही, बंधुता ही मूल्ये आणि राष्ट्राची एकात्मता बळकट व्हावी, या दृष्टिकोनातून #MyConstitutionMyPride हॅशटॅगखाली २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत सदर उपक्रम राज्यातील सर्व शाळांत राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत शालेय स्तरावर चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंधलेखन, चर्चासत्र, पोस्टर निर्मिती, काव्य लेखन, घोषवाक्ये इ. विविध उपक्रम ऑनलाईन-ऑफलाईन राबवले जातील; जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळणार आहे. सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना ट्वीटर/फेसबुक @thxteacher आणि इंस्टाग्राम @thankuteacher या अकाऊंटवर तसेच राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र च्या @scertmaha या ट्विटर अकाऊंटवर आणि @SCERT,Maharashtra या फेसबुक अकाऊंटवरही व्हिडीओ, फोटो आणि अन्य साहित्याची पोस्ट अपलोड करता येणार आहे. २६ नोव्हेंबर २०२१ रोजी भारतीय संविधान दिनी राज्यभरातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांत एकाचवेळी सकाळी १० वाजता भारतीय संविधानातील उद्देशिकेचे वाचन करण्याचे आवाहन शालेय शिक्षणविभागातर्फे करण्यात आले आहे. यामध्ये शाळा, पालक, विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि समाजातील प्रतिनिधींचा सक्रिय सहभाग असणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cGAOdE
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या