Mumbai University Exam:‘तृतीय वर्ष बीएमएस अभ्यासक्रमाच्या सत्र ५च्या २३६ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले आहेत. आसन क्रमांक चुकीचे नमूद केलेल्या अथवा बारकोड चुकीचे नमूद केलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले आहेत. या विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका शोधली जाईल. त्यांनतर त्यांचा निकाल जाहीर केला जाईल. या विद्यार्थ्यांना तांत्रिक चुकीने शून्य गुण आले आहेत. ते दुरुस्त करून सुधारित निकाल जाहीर केला जाईल’, असे विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केले आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/mumbai-university-two-hundred-students-got-zero-marks/articleshow/99658509.cms
0 टिप्पण्या