
मुंबई विद्यापीठाचा वाणिज्य शाखेचा पदवीचा अंतिम वर्षाचा निकाल (T.Y.Bcom Sem VI Result) अखेर जाहीर झाला आहे. विद्यार्थी गेले अनेक दिवस या निकालाची वाट पाहत होते. वाणिज्य शाखेच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या सहाव्या सत्राची ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. एकूण ६७,९७४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, त्यापैकी ४९,७९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५४ आहे. दरम्यान, मंगळवारी २० जुलै रोजी विज्ञान शाखेच्या तृतीय वर्ष बीएस्सी सत्र ६ या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेचा निकाल ७४.४४ टक्के लागला. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3y7XpsV
via nmkadda
0 टिप्पण्या