Advertisement

SSC Result 2021: महाराष्ट्र बोर्डाने जाहीर केलेल्या इयत्ता दहावीच्या निकालात (Class x Result) एकूण ९९.९५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागीय निकाल पाहीला तर शंभर टक्के निकालासह कोकण अव्वल स्थानी आहे. तर नागपूर विभागाचा निकाल ९९.८४ टक्के इतका लागला असून तो विभाग शेवटच्या स्थानी आहे. दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर अंतर्गत मूल्यमापनाने निकाल असतानाही नागपूर विभागात सुमारे एक हजार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. नागपुरमध्ये २९४ विद्यार्थ्यांना शाळांनी दहावीमध्ये शून्य गुण टाकले आहे. विद्यार्थ्यांना शून्य गुण देण्यामागे कोणती कारणे होती? याबाबत अद्याप परीक्षा मंडळालाही काहीही माहिती झालेले नाही. या विद्यार्थ्यांच्या शाळांशी संपर्क साधून शून्य गुण देण्याबाबतची कारणे माहिती करून घेण्यात येतील असे मंडळाने म्हटले आहे. याशिवाय, ७८८ विद्यार्थ्यांच्या ‘डाटा’ची अडचण निर्माण झाली आहे. आसन क्रमांक चुकीचा असणे, पुनर्परीक्षार्थ्यांची माहिती न जुळणे अशा कारणांमुळे हे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांबद्दल बोर्ड काय निर्णय घेते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे? पुन्हा परीक्षा दरम्यान जे विद्यार्थी अंतर्गत मूल्यमापन पद्धतीवर समाधानी नसतील आणि आपली नापसंती बोर्डाकडे कळवतील त्यांच्यासाठी वेगळी परीक्षा होणार आहे. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण देताना आपल्यावर अन्याय झाला असे वाटत असेल तर त्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. असा पाहा निकाल SSC BOARD RESULT या पर्यायावर क्लिक करा तुमचा सीट नंबर टाइप करा आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाका तुमच्या स्क्रीनवर निकाल दिसेल. भविष्यातील उपयोगासाठी प्रिट काढून ठेवा कुठे पाहाल निकाल? https://ift.tt/2U7pMIW या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. याव्यतिरिक्त www.mahahsscsscboard.in या राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर होणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3z4kfBv
via nmkadda