Advertisement

SSCResult2021: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ चा दहावीचा निकाल थोड्याच वेळात जाहीर होणार. यावर्षी करोनामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द झाली. त्यामुळे मूल्यांकन पद्धतीने यंदाचा निकाल जाहीर होणार आहे. असे असले तरी किती टक्के निकाल लागणार? कोणता विभाग अव्वल येणार? असे अनेक प्रश्न सर्वानांच पडले असतील. पण गेल्यावर्षीच्या दहावीच्या निकालात २४२ विद्यार्थ्यांनी सर्व विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवले होते. यंदा गेल्यावर्षीचा संपूर्ण निकाल कसा लागला होता ? यावर एक नजर टाकूया. गेल्यावर्षी दहावीला १५ लाख ७५ हजार १०३ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.९१ होती. मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.९० टक्के होती. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ७ लाख ८९ हजार ३०९ तर उत्तीर्ण विद्यार्थिनींची संख्या ७ लाख ११ हजार ७१६ होती. गेल्यावर्षी दहावीच्या परीक्षेत तब्बल २४२ विद्यार्थ्यांनी चक्क सेंच्युरी मारली होती. २४२ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण म्हणजेच १०० टक्के मिळाले होते. ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल ८३,२६३ होती. शाळांच्या पातळीवर पाहता तब्बल ८,३६० शाळांचा निकाल यंदा १०० टक्के लागला होता. राज्याचा दहावीचा एकूण निकाल ९५.३० टक्के होता. कोकण विभागाचा निकाल ९८.७७ टक्के होता. पूर्वी हा विभाग कोल्हापूर विभागात अंतर्भूत होता, तो नंतर स्वतंत्र करण्यात आला. या विभागातील विद्यार्थी संख्या काही हजारांमध्ये असते आणि यशस्वी विद्यार्थ्यांची टक्केवारीही अधिक असते. यावर्षी दहावी निकाल २०२१ दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर पाहता येणार आहे. निकाल पाहण्याची थेट लिंक या वृत्तात पुढे देण्यात आली आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबतचे सविस्तर परिपत्रक जारी केले आहे. कुठे पाहाल निकाल? https://ift.tt/2U7pMIW या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. याव्यतिरिक्त www.mahahsscsscboard.in या राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल जाहीर होणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3enNyHx
via nmkadda