Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, १३ ऑक्टोबर, २०२१, ऑक्टोबर १३, २०२१ WIB
Last Updated 2021-10-13T12:43:40Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

राज्यातील महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरू होणार Rojgar News

Advertisement
राज्यातील आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू झाले, मात्र कॉलेज कधी सुरू होणार याबाबतची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये होती. राज्यातली सर्व महाविद्यालये येत्या २० ऑक्टोबर २०२१ पासून सुरू करण्यात येणार आहेत, अशी महत्त्वाची सूचना राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेद्वारे केली. मात्र कॉलेज सुरू करायचे वा नाही याबाबतचा निर्णय विद्यापीठांवर सोडण्यात आला आहे. कॉलेज सुरू करण्याबाबत स्थानिक प्राधिकरणाशी विचार विनिमय करून विद्यापीठांनी निर्णय घ्यायचा आहे, असेही सामंत यांनी सांगितले. ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशा विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात बोलवावे, अशा राज्य सरकारच्या स्पष्ट सूचना आहेत. लसीचे दोन डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश ५० टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थितीनिशी कॉलेज सुरू करायचे असल्यास स्थानिक परिस्थितीचा विचार करून त्यानुसार निर्णय घ्यावा, असे सांगताना ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशा विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात बोलवावे, अशा सूचना दिल्या असल्याचे सामंत यांनी सांगितले. ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नाही, अशा विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी महाविद्यालये आणि स्थानिक प्राधिकरणाने पुढाकार घेऊन कार्यक्रम आखावा, असेही निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. काय आहे नियमावली? - राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, सेल्फ फायनान्स विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालये सुरू करण्यास शासनाची मान्यता, मात्र ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने वर्ग सुरू करण्याबाबतचा निर्णय स्थानिक प्राधिकरणाशी विचारविनिमय करूनच विद्यापीठ स्तरावर घ्यावा. - कोविड-१९ लसीचे दोन डोस घेतलेले विद्यार्थीच प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहू शकतील. - ज्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहता येणार नाही, त्यांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून ध्यावी - वसतीगृहे टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत उच्च शिक्षण संचालक, तंत्र शिक्षण संचालक यांनी आढावा घेऊन कार्यवाही करावी. - ज्या विद्यार्थ्यांनी कोविड-१९ ची लस घेतलेली नाही, त्यांच्यासाठी संबंधित विद्यापीठ, महाविद्यालयांनी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणाची विशेष मोहिम राबवावी आणि लसीकरण प्राधान्याने पूर्ण करून घ्यावे. - विद्यापीठ, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे देखील लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3FHQVVv
via nmkadda