Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१, नोव्हेंबर २२, २०२१ WIB
Last Updated 2021-11-22T13:44:02Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

इंजिनीअरिंग, एमबीए,एमसीए प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी Rojgar News

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी, सलग तीन दिवस सुट्ट्या, अमरावती जिल्ह्यात संचारबंदी अशा विविध कारणांमुळे अनेक विद्यार्थ्यांना राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाकडून () राबविण्यात येणाऱ्या इंजिनीअरिंग, 'एमबीए,' 'एमसीए' अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता आले नाही. त्यामुळे या तिन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत नोंदणी करण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी विद्यार्थी आणि संघटनांकडून करण्यात आली आहे. सेलकडून सीईटी परीक्षांच्या गुणांवर प्रथम वर्ष इंजिनीअरिंग, 'एमबीए' आणि 'एमसीए' अशा तीन महत्त्वाच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत नोंदणी आणि कागदपत्रे अपलोड करण्याची अंतिम मुदत २१ नोव्हेंबर असून, 'एमबीए' आणि 'एमसीए'साठी २२ नोव्हेंबर आहे. मात्र, गेल्या आठवड्यात तीन दिवस सलग सुट्ट्या आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक दाखले आणि कागदपत्रे मिळवण्यास अडचणी आल्या. जात पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्यांची संख्या अचानक वाढल्यामुळे, ऑनलाइन प्रणालीच्या कामकाजाचा वेग मंदावला. त्यामुळे राखीव प्रवर्गातील अनेक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज करता येत नसल्याचे चित्र आहे. ही प्रणाली तीन दिवसांपासून बंद असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यामुळे अनेकांना प्रमाणपत्र किंवा अर्ज भरल्याची पावती मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. अमरावती जिल्ह्यात गेल्या आठवडाभर सचांरबंदी होती; त्याचप्रमाणे इंटरनेट सुविधा बंद ठेवण्यात आली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागीच होता आले नाही. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी प्रवेशांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी आणि कागदपत्रे अपलोड करण्याची मुदवाढ देण्याची मागणी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे विद्यार्थ्यांनी केली आहे. शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता राज्यातील 'एमबीए,' 'एमसीए' व इंजिनीअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेत अनेक विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक दाखले नसल्यामुळे नोंदणी केलेली नाही. याचा फटका राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अधिक बसणार आहे. प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ न मिळाल्यास अनेक विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन, तिन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी स्टुडन्ट हेल्पिंग हॅन्डचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZbzJYh
via nmkadda