
अकरावी ऑनलाइन प्रवेशांच्या अखेरच्या टप्प्यातील प्रवेशांना सुरुवात Rojgar News
मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१
Comment

राज्यातील प्रक्रियेतील अखेरच्या टप्प्यातील प्रवेशांना मंगळवार १६ नोव्हेंबर पासून सुरूवात झाली आहे. आतापर्यंत ज्यांना या प्रक्रियेत प्रवेश मिळालेला नाही अशा सर्व दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या फेरीद्वारे प्रवेश घेता येईल. कनिष्ठ महाविद्यालयातील २८ टक्के जागा अद्यापही रिक्त आहेत. त्या जागांवर हे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावरील प्रवेश होत आहेत. या तिसऱ्या फेरीलाच २२ नोव्हेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थी www.11thadmisson.org.in या संकेतस्थळावरून प्रवेश घेऊ शकतात. हे प्रवेश झाल्यावर या विद्यार्थ्यांचे अकरावीचे वर्ग २२ नोव्हेंबरपासून सुरू होतील. प्रथम प्राधान्य फेरीतील प्रवेशांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे - - १६ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर - नवी नोंदणी, अर्जाचा पहिला भाग भरणे, पडताळणी, मिळालेला प्रवेश रद्द करणे आदी. - १६ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर - प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरीतील अलॉटमेंटसाठी अर्ज करणे - १६ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर - मिळालेले कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश कन्फर्म करण्यासाठी 'प्रोसिड फॉर अॅडमिशन' वर क्लिक करून प्रवेश निश्चितीची कार्यवाही करणे नवे प्रवेश २३ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर (दुपारी १२ वाजेपर्यंत) - नव्याने नोंदणी, अर्जाचा पहिला भाग भरणे, पडताळणी, आदी कार्यवाही २३ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर - शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत समुपदेशन आणि अलॉटमेंट २३ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर - मिळालेले कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश कन्फर्म करण्यासाठी 'प्रोसिड फॉर अॅडमिशन' वर क्लिक करून प्रवेश निश्चितीची कार्यवाही करणे
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3HpPUCy
via nmkadda
0 Response to "अकरावी ऑनलाइन प्रवेशांच्या अखेरच्या टप्प्यातील प्रवेशांना सुरुवात Rojgar News"
टिप्पणी पोस्ट करा