Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१, डिसेंबर ३०, २०२१ WIB
Last Updated 2021-12-30T05:00:18Z
Rojgar

दहावी, बारावीच्या परीक्षार्थ्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ

Advertisement
म. टा. प्रतिनिधी, पुणे आगामी दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. आतापर्यंत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे प्राप्त झालेल्या अर्जांमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अर्जात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्य मंडळाकडे आतापर्यंत दहावीच्या परीक्षेसाठी १६ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांचे १४ लाख ४७ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. ज्या परीक्षा २०२१ मध्ये होणार होत्या त्यासाठी दहावीच्या १६ लाख ६३ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते; तर बारावीच्या १३ लाख ९० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. गेल्या वर्षीची ही संख्या लक्षात घेतल्यास डिसेंबर महिन्यात दोन्ही परीक्षांसाठी इतके अर्ज दाखल झाल्याने यंदा दोन्ही परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे. गेल्या वर्षी करोनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षांचे अर्ज केले नव्हते. शहरी आणि ग्रामीण भागांत विद्यार्थ्यांच्या घरात करोनाचा प्रादुर्भाव असल्याने अनेक विद्यार्थी परीक्षांचे अर्ज भरू शकले नव्हते. त्याचप्रमाणे २०१८ आणि २०१९ मध्ये दहावीचा निकाल घटला असल्याने त्याचा परिणाम बारावीच्या अर्जसंख्येवर दिसून आला. या कारणामुळे २०२१ च्या बारावीच्या परीक्षेला अर्जांची संख्या कमी होती. करोनापूर्वी म्हणजेच २०२० मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत निकालाची टक्केवारी वाढल्याने आता या वर्षी बारावीच्या परीक्षेला अर्ज करणारे विद्यार्थीही वाढले आहेत. परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज वाढल्याने शिक्षणाची गाडी आता पूर्वपदावर आल्याचे तज्ज्ञांकडून बोलले जात आहे. यंदा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी परीक्षेच्या एक दिवस आधीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यामुळे इथून पुढच्या काळातही विद्यार्थी परीक्षांसाठी अर्ज करू शकतात. या कारणांमुळे यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या अर्जामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. विलंब शुल्क नाही दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आता अर्ज करण्यासाठी परीक्षेपर्यंतची मुदत देण्यात आली असल्याने कोणत्याही विद्यार्थ्याकडून विलंब शुल्क आकारले जाणार नाही, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. 'अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतीपर्यंत थांबू नका' विद्यार्थ्यांना परीक्षेचा अर्ज करण्यासाठी परीक्षेच्या आधी एक दिवसापर्यंत जरी मुदत दिली असली, तरी विद्यार्थ्यांचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची छाननी करून प्रवेशपत्र तयार करण्याची प्रक्रिया करावी लागते. यासाठी राज्य मंडळाला पुरेसा वेळ मिळायला हवा. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी अगदी शेवटच्या दिवसाची वाट पाहू नये, असे आवाहन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केले आहे. परीक्षा अर्जाची सद्यस्थिती २०२० -२१ २०२१-२२ दहावी १६ लाख ६३ हजार १६ लाख १० हजार बारावी १३ लाख ९० हजार १४ लाख ४७ हजार


source https://maharashtratimes.com/career/career-news/ssc-hsc-exam-2022-increase-in-number-of-students-appearing-for-exam/articleshow/88580532.cms