TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

राज्यात नोव्हेंबरमध्ये २६ हजार ९३ बेरोजगारांना रोजगार Rojgar News

करोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये नोव्हेंबर २०२१ मध्ये २६ हजार ९३ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती या विभागाचे मंत्री यांनी दिली. , ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो. अशा विविध उपक्रमांमधून मागील वर्षी २०२० मध्ये राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, तर चालू वर्षात जानेवारी ते नोव्हेंबरअखेर १ लाख ७३ हजार ९७४ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असे मंत्री मलिक यांनी सांगितले. मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://ift.tt/3hxs0Ib हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरीइच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते. नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी विभागाकडे, महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९२ हजार ३५० इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरीइच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मलिक यांनी सांगितले. मुंबईत नोव्हेंबरमध्ये ९ हजार १८ बेरोजगारांना रोजगार नोव्हेंबर २०२१ मध्ये विभागाकडे ४६ हजार २८३ इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात १२ हजार ५७७, नाशिक विभागात ५ हजार ००३, पुणे विभागात सर्वाधिक १८ हजार ०९७, औरंगाबाद विभागात ५ हजार ८११, अमरावती विभागात १ हजार ६८६ तर नागपूर विभागात ३ हजार १०९ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली. नोव्हेंबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे २६ हजार ०९३ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात ९ हजार ०१८, नाशिक विभागात २ हजार ०८९, पुणे विभागात सर्वाधिक १२ हजार ५९२, औरंगाबाद विभागात १ हजार ७७०, अमरावती विभागात २२६ तर नागपूर विभागात ३९८ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ooRVr9
Source https://ift.tt/310mqee

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या